2 लाखांवर कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांसाठी देखील कर्जमाफीची योजना आणणार : उपमुख्यमंत्री अजित पवार


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : – महाविकासआघाडी सरकारकडून 2 लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला की 2 लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार की नाही ? यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून खुलासा करण्यात आला. दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पॅकेज देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

2 लाखावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पॅकेज देण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही सरकारकडून सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. नव्या आर्थिक वर्षात याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post