सीएए कायद्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरवण्यात आले, कायदा भल्यासाठीच- नरेंद्र मोदी


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील रामलीली मैदानात नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले की, अनेकतामध्ये एकता हीच आपल्या देशाची विशेषता आहे. मोदींनी दिल्लीतील 40 लाख अनधिकृत कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्यामालकी हक्कासाठी आश्वासन दिले.

येत्या फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोदींनी सभेद्वारे दिल्लीकरांना मोठी आश्वासने दिली. शिवाय त्यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावरही जोरदार टीका केली. "कोणत्याही पक्षाने प्रामाणिकपणे काम केले नाही. आम्ही काम करत होतो तर त्यात आडकाठी आणण्याचे काम ते करत होते. पण, त्यांच्याकडून काहीही साध्य झाले नाही. कारण, समस्या तशाच ठेवणं, हे आमच्या संस्कारात नाही, असा टोला मोदींनी लगावला.

यावेळी मोदी म्हणाले की, "आयुष्यातून जेव्हा अनिश्चितता निघून जाते, त्याचा काय प्रभाव पडतो हे मी तुमच्या चेहऱ्यावर पाहत आहे. तुमचा उत्साह मी पाहत आहे. मला आनंद आहे की, दिल्लीतील 40 लाखांपेक्षा जास्त नागरिकांच्या आयुष्यात नवीन पाहाट आणण्याची संधी मला मिळाली. 'पंतप्रधान उदय योजने'च्या माध्यमातून तुम्हाला घर, जमीन तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संपत्तीवर मालकी अधिकार मिळून दिला जाईल.

‘पोलिस मदत करताना जाती-धर्म पाहत नाही’
मोदी पुढे म्हणाले की, ‘‘पोलिसांना हिंसाचारात मारले जात आहे. पोलिस कोणाचे दुश्मन नाहीत. स्वातंत्र्यानंतर देशभरात 33 हजार पोलिस शहीज झाले आहेत. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस शहीज झाले आणि तुम्ही त्यांना मारत आहात. जेव्हा एखादे संकट येते, तेव्हा पोलिसवाले तुमची जाती, धर्म पाहत नाहीत. तुमच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मार्केटमध्ये आग लागली होती, तेव्हा पोलिसांनी अनेकांचा जीव वाचवला. त्यांनी बचाव कार्यादरम्यान पोलिसांनी लोकांना त्यांचा धर्म विचारला नाही. 100 वर्षे जुने पक्ष शांतीबद्दल बोलायला तयार नाहीत.’’


योजनांसाठी कोणते प्रमाणपत्र मागितले नाही
मोदी पुढे म्हणाले की, ‘‘आमची प्रत्येक योजना पाहा, जेव्हा उज्ज्वला योजना आली, तेव्हा 8 कोटी कुटुंबाला मोफत गॅस सिलेंडर देण्यात आले. त्यावेळेस आम्ही त्यांना जाती,धर्माचे प्रमाणपत्र मागितले नाही. मी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना विचारतो की, तुम्ही देशाला का भडकवत आहात. मागील पाच वर्षात आमच्या सरकारने 1.5 कोटी गरिबांना घर दिले. आम्ही कोणालाच त्यांची जात,धर्म विचारला नाही. देशाची दिशाभूल केली जात आहे. पण, विरोधक डॉक्युमेंट्सच्या नावाने देशाची दिशाभूल करत आहेत. आम्ही कधीच कोणत्या योजनेसाठी डॉक्यूमेंट्सची मागणी केली नाही. मोफत वीजेसाठी, उज्ज्वला योजनेसाठी, घरकुल योजनेसाठी आम्ही गरिबांच्या झोपडीत गेलो. आम्ही कधीच कोणाला विचारले नाही, तुम्ही मंदीरात जाता, मशीदीत जाता का गुरुद्वारामध्ये जाता. जगातील सर्वात मोठी हेल्थ स्कीम आज भारतात सुरू आहे. देशातील 50 कोटींपेक्षा जास्ज गरिबांसाठी 5 लाखांचा विमा दिला. पण, राजकीय कारस्थानामुळे दिल्लीत ही स्कीम लागू होऊ शकली नाही.’’

‘विरोधकांचे राजकारण मला समजले आहे’
मोदी पुढे म्हणाले की, ‘‘त्यांनी देशाला अराजकतेकडे ढकलले. मुलांची शाळा, बस, ट्रेनवर हल्ले केले. लोकांची दुकाने, सायकल, मोटारसायकलला जाळले. भारतातील करदात्यांच्या पैशांपासून बनवलेल्या सार्वजनिक साधनांना नुकसान पोहचवले. यांचे उद्देश आणि राजकारण देशाला चांगलंच माहित आहे. जेव्हा मी पहिल्यांदा निवडणूक आलो, तेव्हा त्यांना धक्का बसला. दुसऱ्यांदा निवडणु येऊ नये म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. पण, देशातील जनतेने आधीपेक्षा जास्त आशीर्वाद दिला. तुम्हीच मोदीला या पदावर बसवले आहे, तुम्हाला राग काढायचा असेल तर मोदीवर काढा, मोदीचे पुतळे जाळा, मोदीला बुट-चप्पल मारा, गरीबांना त्यांच्या साधन संपत्तीला नुकसान पोचवू नका.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post