उपमहापौर मालनताई ढोणे व चाणक्य फौंडेशनचा अनोखा उपक्रम
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील प्रत्येक नागरिकांनी माझे नगर माझ अभियान हे ध्येयधोरण बाळगून स्वच्छ सुंदर व हरित नगर करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे. कचराकुंडी मुक्ती शहर करण्यासाठी नागरिकांनी आपला ओला व सुका कचरा डस्टबीन मार्फत थेट घंटागाडीमध्ये टाकावा. स्वच्छ व सुंदरमुळे नागरिकाचे आरोग्य निरोगी व सदृढ राहण्यास मदत होईल यासाठी मी आजपासून नगर शहरामध्ये सकाळी घरोघरी जावून स्वच्छ नमस्कार घालून महिला व मुलींमध्ये स्वच्छते संदर्भात जनजागृती करणार आहे, असे मत उपमहापौर मालनताई ढोणे यांनी व्यक्त केला.
नगर शहर स्वच्छ अभियानाअंतर्गत मनपा व चाणक्य फौंडेशन यांच्यावतीने चितळे रोड परिसरातील अपार्टमेंट व घरोघरी जावून उपमहापौर मालनताई ढोणे यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करुन सर्व नगरकरांना स्वच्छ नमस्कार घालण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. यावेळी ऍड. प्रसन्ना जोशी, मुख्य स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख, अमित गटणे, सुहासीनी बडवे, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, राजू सामल, गौरव भालेराव, संजय उमाप, दत्तू शिंदे, विकी पवार, दत्ता देठे आदींसह महिला, युवती, नागरिक उपस्थित होते.
उपमहापौर मालनताई ढोणे यांनी मंगळवारी (दि.२४) सकाळीच चितळे रोड परिसरात जावून नागरिकांच्या घरी थेट संवाद साधला. या उपक्रमात त्या पहिल्यांदा नागरिकांना स्वच्छ नमस्कार घालतात व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम करतात. यामध्ये ओला सुका कचर्याचे वर्गीकरण करुन आपला कचरा घंटागाडीमध्ये टाकावा. डस्टबीन ते घंटागाडी असा प्रवास रस्त्यावर कोणीही कचरा टाकू नये.नागरिकांनी आपल्या घराच्या कचर्यापासून घरी कंपोस्ट खत निर्मिती करण्याचे काम करावे.कचर्यापासून बायोगॅस निर्मिती घरोघरी आपण करू शकतो. कचरा मुक्तीसाठी आपण सर्वांनी एकत्र येवून लोकचळवळ उभी करावी. नगर शहर देशामध्ये स्वच्छ, सुंदर व हरित शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या स्वच्छता अभियानामध्ये भाग घेऊन सहकार्य करावे असे आवाहन करत आहेत.
यावेळी स्वच्छता निरीक्षक के. के. देशमुख व ऍड. प्रसन्ना जोशी यांनीही नागरिकांना स्वच्छते संदर्भात मार्गदर्शन केले.

Post a Comment