रेल्वे पेटली, प्रवाशांनी मारल्या उड्या, अन्यथा...;अशी घडली घटना



माय नगर वेब टीम 

अहमदनगर -

नगरमध्ये रेल्वे गाडीच्या डब्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत रेल्वेचे सहा डबे जळून खाक झाले.



नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी सोमवारी (दि.१६) दुपारी रेल्वेगाडीला भीषण आग लागून गाडीचे ६ डबे भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. रेल्वेगाडीत अवघे ३-४ प्रवासी होते, त्यांनी पटापट खाली उड्या टाकल्याने कुठलीही जिवित हानी सुदैवाने झाली नाही. मात्र या दुर्घटनेत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.



नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावर रेल्वेची वाहतूक सुरू झालेली आहे. सोमवारी दुपारी आष्टीकडून नगरकडे येत असलेली रेल्वेगाडी नगर तालुक्यातील वाळुंज शिवारात असलेल्या नगर-सोलापूर महामार्ग क्रॉसिंगच्या ठिकाणी आली. तेथे गाडी थांबल्यावर अचानक इंजिनच्या पाठीमागील डब्याला भीषण आग लागली. ही आग नंतर पसरत जावून ६ डबे पेटले. गाडी उभी असताना आग लागल्याचे लक्षात आल्यावर गाडीत असलेले ३-४ प्रवासी तसेच इंजिन मध्ये असलेले चालक व इतर रेल्वे कर्मचारी यांनी पटापट गाडीच्या खाली उड्या घेतल्या. तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post