‘या’ 6 गोष्टींचे पालन करणारे लोक झटपट होतात चवळीच्या शेंगेसारखे बारीक, खुद्द सायन्सने मान्य केली गोष्ट!



हेल्दी आणि फिट राहण्यासाठी, विशेषज्ञ बहुतांश वेळा सकाळच्या पहिल्या जेवणावर म्हणजेच नाश्त्यावर अधिक भर देतात. अनेक डाएट एक्सपर्ट्स देखील या गोष्टीशी सहमत आहेत की कोणत्याही परिस्थितीत नाश्ता स्किप करू नये. तुम्हाला हवे असल्यास ते दुपारच्या जेवणासोबत ब्रंच म्हणून घ्या, पण तो सोडण्याचा विचार करू नका. कारण यामुळे तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा तर मिळतेच, शिवाय तुम्हाला ताजेतवानेही वाटते. याशिवाय नाश्ता केल्यानंतर अनेक तास भूक लागत नाही व पोट भरलेले राहते.
पण नाश्ता केल्यानंतर काही तासांतच जर तुम्हाला भूक लागत असेल किंवा थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या नाश्त्याच्या मेन्यूकडे लक्ष दिले पाहिजे. Sun.com च्या अहवालात असे म्हटले आहे की, नाश्ता केल्यानंतर काही वेळातच तुम्हाला पुन्हा भूक लागत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही नाश्ता करताना अशी चूक करत आहात, ज्यामुळे तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीपासूनच वजन कमी करण्यात अपयश येईल आणि चरबी वाढून तुम्ही लठ्ठच होत जाल. चला तर मग जाणून घेऊया त्या 6 चुकांबद्दल, ज्या तुम्ही सहसा नाश्ता करताना कटाक्षाने टाळायला पाहिजेत.
भरपूर साखर खाणं

न्याहारी करूनही तुमची भूक भागत नसेल तर सर्वात आधी पाहा की, वेळ वाचवण्यासाठी तुम्ही शॉर्टकट म्हणजे पॅक केलेले आणि बेक केलेले पदार्थ तर खात नाही ना. किंवा कदाचित तुम्ही पॅक केलेला संत्र्याचा रस पीत असाल. आम्ही तुम्हाला सांगू की कोणत्याही ब्रँडच्या पॅक केलेल्या ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे जास्त कॅलरीजचे सेवन टाळण्यासाठी असाच पॅकेट खरेदी करा ज्यावर 100 टक्के ज्यूस असे लिहिलेले असेल. तसं तर ज्यूस ऐवजी फळांचे सेवन करणे हाच उत्तम पर्याय आहे. यामध्ये फायबरसोबतच साखर आणि कॅलरीजही खूप कमी असतात. लंडनस्थित न्युट्रिशनिस्ट रॉब हॉब्सन यांनी The Sun ला सांगितले की, जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढू शकते. डाएट एक्सपर्ट्स कॅरी रूक्सटन यांनी The Sun ला सांगितले की, जास्त साखर आणि कमी फायबर असलेला नाश्ता तुमची भूक वाढवू शकतो.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post