नागरिकत्व सुधारणा कायद्यावर माधव भंडारी यांचे अहमदनगरला गुरुवारी व्याख्यान
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -केंद्र सरकारने नुकत्याच लागू केलेला नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व देशभरात राबवली जाणारी राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या विषयांवर जेष्ठ विचारवंत माधव भंडारी यांचे व्याख्यान 9 जानेवारी सायंकाळी 6 वाजता सावेडीच्या माऊली संकुल सभागृहात होणार आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले आहे.
लोकसभेत व राज्यसभेत नुकताच नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाला आहे. परदेशातील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देण्याबाबतच्या कायद्यात सुधारणा करून हा कायदा आता संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याने तो देशभर लागू झाला आहे. या कायद्याला देशात विविध ठिकाणी मोठे समर्थन मिळत असताना काही मूठभर विघ्नसंतोषी प्रवृत्ती या कायद्या विरोधात आंदोलने व तोडफोडीचे प्रकारही घडवीत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) नेमका काय आहे व तो कोणासाठी आहे याची माहिती माधव भंडारी येथे देणार आहेत.
सावेडीच्या माऊली संकुल सभागृहात श्री माधव भंडारी यांचे नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) ’भ्रम आणि तथ्य’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अशोक गायकवाड, धनंजय जाधव व चंद्रकांत काळोखे यांनी व्याखान उपक्रमाचे संयोजन केले असून, या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनंत देसाई, अॅड. अनिल लांडगे, डॉ.हर्षवर्धन तन्वर व कमलेश भंडारी परिश्रम घेत आहेत. नगरकरांनी या व्याख्यानास उपस्थित राहून नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर संकल्पना जाणून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment