जिल्ह्याच्या विकासात केवळ राजकारणी नव्हे, तर पत्रकारांचाही मोठा वाटा ः गडाख


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर ः ``आपल्या जिल्ह्यातील पत्रकारितेला मोठा वारसा आहे. यापुर्वीची पिढी मी पाहिलेली आहे. मुळा, कुकडी धरणासाठी त्या काळात पत्रकारांनी रान उठविले होेते. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासात केवळ राजकारणाचा नव्हे, तर पत्रकारांचाही मोठा वाटा आहे. पत्रकारितेची ही परंपरा जपण्याचे काम आजच्या पत्रकारांनी करावे,`` अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली.

अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त पत्रकार दिन व संस्थेच्या राैप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात जीवन गाैरव पुरस्कार गडाख यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते गडाख व त्यांच्या पत्नी शारदाताई गडाख यांनी तो स्विकारला. या वेळी सत्काराला उत्तर देताना गडाख बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार होते. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महापाैर बाबासाहेब वाकळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ. सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकारांना पुरस्कार तसेच वर्षभरात पुरस्कार मिळालेल्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. प्रेस क्‍लबच्या सभासदांना पाच लाख रुपयांच्या विम्याची वितरण करण्यात आले.

गडाख म्हणाले, `` आमच्या पिढीला रोज वर्तमानपत्र मिलाले नाही,तर अस्वस्थ वाटते. परंतु सध्या सोशल मीडियाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात आहे. त्यातून नवीन पिढी वर्तमानपत्रे वाचतील की नाही, हे पहावे लागेल. नव्या पिढीला सुट होईल, असे वर्तमानपत्रे तयार करावी लागतील.``

अरुण खोरे यांनी आजच्या पत्रकारितेतील आव्हाने या विषयी अभ्यासपूर्ण मत मांडले. आता स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वच वर्तमानपत्रांनी स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

अध्यक्षीय भाषणात पोपटराव पवार म्हणाले,`` नगर जिल्ह्याच्या तिनही मंत्र्यांकडे चांगले खाती आहेत. त्यामुळे नगर शहराचा व जिल्ह्याचा चेहरा बदलण्यास चांगला वाव आहे. त्यासाठी पत्रकारांनी वारंवार लेखणीच्या साह्याने ठोस भूमिका घेवून विकासासाठी पुढे यावे.
प्रास्तविकातून अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी अहमदनगर प्रेस क्लबची भूमिका विषद करून वर्षभर केलेल्या कामाचा आढावा घेतला. सकाळचे कार्यकारी संपादक अॅड. डाॅ. बाळ ज. बोठे पाटील, लोकमतचे ब्युरो चिफ सुधीर लंके, समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी आदींची या वेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. उपाध्यक्ष राजेंद्र झोंड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष अरुण वाघमोडे, सचिव मुरलीधर कराळे, सहसचीव दीपक कांबळे, खजिनदार ज्ञानेश दुधाडे, सदस्य ललित गुंदेचा, कैलास ढोले, जयंत कुलकर्णी, मनोज मोतियानी, सुभाष मुदळ, निशांत दातीर, अशोक झोटींग यांनी प्रयत्न केले.


विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार
या वेळी उत्तम प्रशासनप्रमुख पुरस्कार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, उत्कृष्ठ प्रशासकीय अधिकारी पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, आदर्श व्यावसायिक पुरस्कार कोहिनूर दालनाचे संचालक प्रदीप गांधी, उत्कृष्ठ वैद्यकीय सेवा पुरस्कार नोबल हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. बापूसाहेब कांडेकर, आदर्श कृतिशिल सरपंच पुरस्कार ढवळपुरीचे सरपंच डाॅ. राजेेश भनगडे, आदर्श कृतिशील शाळेसाठीचा पुरस्कार खांडके येथील जिल्हापरिषदेची शाळा, तसेच स्व. भास्करराव डिक्कर गतीपत्र पुरस्कार आबिदखान दुलेखान यांना प्रदान करण्यात आला.

बेस्ट रिपोर्टर आॅफ द ईअर 2020 पुरस्कारार्थी असे ः
दीपक रोकडे (सकाळ), अण्णासाहेब नवथर (लोकमत), समीर दाणी (पुण्य नगरी), दीपक कांबळे (दिव्य मराठी), मयुर मेहता (पुढारी), अशोक परुडे (महाराष्ट्र टाइम्स), बद्रीनारायण वडणे (सार्वमत), रवी कदम (प्रभात), मोहिनीराज लहाडे (लोकसत्ता), मिलिंद देखणे (सामना), दिलीप वाघमारे (केसरी), ललित गुंदेचा (नवा मराठा), भाऊसाहेब होळकर (समाचार), सुनील चोभे (नगर सह्याद्री), संदीप रोडे (नगर टाइम्स), अंबरीश धर्माधिकारी (अहमदनगर घडामोडी), सुभाष मुदळ (नगर स्वतंत्र), प्रशांत पाटोळे (मराठवाडा केसरी), निशांत दातीर (नवा काळ), अशोक सोनवणे (लोकमंथन), अनिल शहा (प्रेस फोटोग्राफर), सुशिल थोरात (जय महाराष्ट्र), अमीर सय्यद (ए. टीव्ही),

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post