माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - नागरिकत्व कायद्याच्या समर्थानात भाजपने आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात कायद्याच्या समर्थनात एक सभा आयोजित केली होती. या सभेला संबोधित करताना विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्य सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
"तुम्ही आमची परवानग्या नाकारू शकता, आमचे मोर्चे रोखू शकता परंतु नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकारकडून परवानगी दिली जात आहे. परंतु, आम्हाला परवानगी नाकारली जाते. राज्यातील सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का?"अशा शब्दात विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर जोरदार हल्ला चढवला. भाजपने आज ऑगस्ट क्रांती मैदानात सीएए व नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. परंतु, रॅलीदरम्यान हिंसा घडण्याची शक्यता असल्याचे सांगत पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली नाही.
मुंबई - नागरिकत्व कायद्याच्या समर्थानात भाजपने आज मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात कायद्याच्या समर्थनात एक सभा आयोजित केली होती. या सभेला संबोधित करताना विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्य सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
"तुम्ही आमची परवानग्या नाकारू शकता, आमचे मोर्चे रोखू शकता परंतु नागरिकत्व कायद्याला समर्थन देण्यापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही. जाळपोळ करणाऱ्यांना सरकारकडून परवानगी दिली जात आहे. परंतु, आम्हाला परवानगी नाकारली जाते. राज्यातील सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का?"अशा शब्दात विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकावर जोरदार हल्ला चढवला. भाजपने आज ऑगस्ट क्रांती मैदानात सीएए व नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. परंतु, रॅलीदरम्यान हिंसा घडण्याची शक्यता असल्याचे सांगत पोलिसांनी रॅलीला परवानगी दिली नाही.
Post a Comment