देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार द्या : नरेंद्र मोदी






माय नगर वेब टीम
नाशिक -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज नाशिकमध्ये झाला आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून विरोधकांचा चांगला समाचार घेतला.

राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर सरकार दिलं. पूर्ण बहुमताशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने प्रगतीशील, विकसनशील राज्य दिले. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार देण्याची महाराष्ट्राची जबाबदारी आहे , असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. नरेंद्र मोदींचं हे वक्तव्य शिवसेनेला सूचक इशारा मानला जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post