अहिल्यानगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील उपबाजारचे भूमिपूजन
माय नगर वेब टीम
अहिल्यानगर : जिल्ह्यात संत्री उत्पादन होत असल्याने त्या अनुशंगाने शेतकरी युवकांना एक्सपोर्ट टेनिंग देण्याची व्यवस्था करण्यात येईल . त्याचा संपूर्ण खर्च सरकार कडून करण्यात येईल. जगातील सर्वात मोठी कृषि उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात होणार असून ती समृद्धि महामामार्गास जोडली जाणार आहे. ही बाजार समिती अहिल्यानगर जिल्ह्याजवळ होणार असल्याने अहिल्यानगर कृषी उपन्न बाजार समितीला एक्सपोर्टची सुविधा उपलब्ध होणार असेल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले. दरम्यान उपबाजार साठी दीड कोटीचे संत तुकडोजी महाराज शेतकरी निवास देण्यात येईल असे ते म्हणाले.
अहिल्यानगर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या चिचोंडी पाटील उपबाजारचे भूमिपूजन (12 सप्टेंबर रोजी) पणन व राजशिष्टचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते .
यावेळी माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, कृषि उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती भानुदास कोतकर, भाजपा चे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, तालुका उपनिबंधक शुभांगी गौड, जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास शिंदे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रावसाहेब शेळके , माजी जिल्हा परिषद सदस्य सचीन जगताप , बाजार समिती चे सभापती भाऊसाहेब बोठे , उपसभापती रभाजी सुळ , सचिव अभय भिसे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे यांनी केले.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी मंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्ज वितरणाचे धनादेश वितरीत करण्यात आले.
अध्यक्ष पदावरून बोलतांना पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना केंद्रीभूत ठेऊन अर्थव्यवस्था मजबूत करता येईल असा विचार करूनच भूमिका घेत आहे. शेतकऱ्यांच्या जानता राज्य म्हणून परिचित असणारे आपल्या राज्याचे जेष्ठ नेते जे बराच काळ मुख मंत्री राहीलेले त्यांनी शेतकऱ्याच्या हिताच्या कोणते निर्णय घेतले? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.
विजय साबळे यांनी सूत्र संचालन केले. माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
Post a Comment