शेतकऱ्यांवर अन्याय, जिल्हा बँकेचा मनमानी कारभार आणला नगर तालुका महाविकास आघाडीने चव्हाट्यावर!

 


माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - मार्च अखेर मुळे जिल्हा सहकारी बँकेकडून पीककर्जाची वसुली सुरु आहे. परंतु नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ कर्ज मुददल रकमेची वसुली करण्याचे सहकार आयुक्तांचे आदेश असतानाही बँकेकडून मुद्दली सोबत व्याजही घेतले जात आहे. याच्या निषेधार्थ नगर तालुका महाआघाडीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत व्याजाची वसुली त्वरित थांबविण्याची मागणी केली.


महाआघाडीचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, माजी जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, माजी सभापती संदीप गुंड, माजी सदस्य गुलाब शिंदे आदींनी हे आंदोलन केले. तत्पूर्वी या शिष्टमंडळाने जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेवून व्याजाची वसुली थांबविण्याची मागणी केली. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांची भेट घेत निवेदन दिले. व सहकार आयुक्तांच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा बँकेला कराव्यात अशी मागणी केली. मात्र जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने तशा सूचना नं दिल्याने या शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक पुरी यांच्या कार्यालयाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरु केले. जो पर्यंत व्याज वसुली थांबविण्याचे आदेश दिले जात नाहीत तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा संदेश कार्ले यांनी दिला.

सध्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्हा बँकांनी पीककर्जाची नियमित परतफेड करत असलेल्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुददल रकमेची वसुली करणेबाबत पत्र देण्यात आलेले आहे. तथापी दुष्काळी परिस्थितीमध्येही नगर जिल्हा बँकेकडून व्याजाच्या रकमेची आकारणी करण्यात येत आहे.


शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून उपरोक्त पत्राची जिल्हा बँकेकडून अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांची म्हंटली जाणारी बँक खरोखरच शेतकऱ्यांचे हीत जपतेय का? बँकेचा हा मनमानी कारभार बँकेच्या चेअरमन यांच्याच इशाऱ्यावर सुरु असल्याचा आरोपही संदेश कार्ले यांनी केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post