संगमनेरात धनवान पुरुषांना शोधून त्यांना ब्लॅकमेल करणारी महिलांची टोळी कार्यरत



माय वेब टीम 
संगमनेर - श्रीमंत माणसांना शोधून व त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल (Blackmail) करणारी महिलांची टोळी (Women's gang) संगमनेरात (Sangmner) कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या टोळीतील काही महिलांनी अकोले (Akole) तालुक्यातील अंबड येथील एका इसमास ब्लॅकमेल करून त्याच्याकडील मोबाईल (Mobile) व एक हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे. याबाबत सदर इसमाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

अकोले (Akole) तालुक्यातील अंबड (Ambad) येथील एका व्यक्तीवर दीड महिन्यांपूर्वी हा प्रसंग उद्भवला होता. फेसबुकच्या (Facebook) माध्यमातून त्याची संगमनेर (Sangmner) येथील एका तरुणीशी ओळख झाली. सदर महिलेने त्याच्यासोबत ओळख वाढवून नंतर संगमनेर येथे भेटीसाठी बोलावले. शहरातील शेतकी संघाच्या पेट्रोल पंपाजवळ त्यांची भेट झाली. या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर सदर महिलेने सदर इसमास गणेश नगर येथे तिच्या मावशीच्या घरी नेले.

या घरांमध्ये तीन महिला उपस्थित होत्या. या महिलांनी त्या व्यक्तीला चहा घेण्याचा आग्रह केला. या घरात एकही पुरुष नसल्याने सदर इसमास शंका आली. यातील एका महिलेने बोलण्याच्या नादात त्याच्याकडील मोबाईल घेतला. या खोलीत काहीतरी वेगळाच प्रकार चालत असल्याची शंका आल्याने सदर इसमाने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी एका महिलेने दरवाजा बंद करून घेतला. तिने धमकी देऊन त्याच्याकडील एक हजार रुपये काढून घेतले. यानंतर दोन महिला त्यांच्या स्कुटीवर बसून निघून गेल्या.
सदर इसमाने त्यांचा पाठलाग करून अकोले बायपास येथे त्यांना अडविले. आपला मोबाईल परत द्या अशी त्यांनी मागणी केली. तू आम्हाला दहा हजार रुपये दे नाहीतर तू आमची छेड काढली म्हणून आरडाओरड करू अशी धमकी या महिलेने दिली. यावेळी त्यांनी दोघा पुरुषांनाही बोलावले. हे सर्वजण नंतर वेगवेगळ्या दिशेने निघून गेले. याबाबत सदर इसमाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. सदर महिलेच्या ताब्यातून आपला मोबाईल त्वरित द्यावा. मोबाईल मध्ये कुटुंबाचे फोटो असल्याने सदर महिला त्याचा गैरवापर करतील अशी शंका त्याने या तक्रार अर्जात केली आहे.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अहमदनगर शहरात काही महिन्यांपूर्वी आणि हनी ट्रॅप प्रकार उघडकीस आला होता संगमनेरातही आता असा प्रकार करणार्‍या महिलांची टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. सदर महिलांनी यापूर्वीही वेगवेगळ्या पुरुषांसोबत असे प्रकार केल्याचे समजते. मात्र याबाबत कोणी तक्रार केली नव्हती आज सदर इसमाने याबाबत तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी सबंधित महिलांना विरोधात भादंवि कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशा महिलांपासून सावध राहावे

फेसबुक व्हॉट्सअ‍ॅप याचा वापर करून एखादी महिला जवळीक वाढवत असेल तर अशा महिलांपासून नागरिकांनी सावध राहावे. त्यांच्यासोबत चॅटिंग करू नये असा प्रकार कुणाच्या बाबत घडत असेल तर त्याने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांनी केले आहे..

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post