“दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई -  दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन आता व्यापक स्वरूप प्राप्त करताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी, या आंदोलनामागे विरोधकांचा हात असल्याचे अनेकदा आरोप केले आहेत. परंतु, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र या आंदोलनाबाबत एक वादग्रस्त विधान केलं. सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा यात हात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.



प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच, त्यांना घरात घुसून फटकवायला हवं असंही कडू म्हणाले. “गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post