भाजपवर भुजबळ संतापले म्हणाले....

माय अहमदनगर वेब टीम

येवला - कुठलेही मुद्दे हाती घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे योग्य नाही. देशात काय भाजपच राज्यकर्ते म्हणून राहणार का? इतरांना राज्य करण्याचा अधिकार नाही का, असा संतप्त सवाल राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

ते येवला दौऱ्यावर आले असता भाजपच्या धार्मिक आघाडीकडून राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी भुजबळ म्हणाले, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गर्दीचे नियंत्रण करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आज मुंबईसह इतर मोठ्या शहरात, धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे याठिकाणी गर्दी नियंत्रण करण्याबाबत राज्य सरकार नियोजन करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिवाळीनंतर मंदिरे सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पूर्वपदावर आणण्यासाठी शासन सकारात्मक असून, मंदिर प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.

सद्या कुठलेही मुद्दे हाताशी घेऊन राज्य शासनाला अडचणीत आणण्याचे कारस्थान केले जात आहे. केवळ राजकारणासाठी चाललंय अशी टीका त्यानी केली. प्रत्येक बहुजन समाजातील कुटुंबात दररोज देवपूजा केली जाते. त्यानंतरच ते घराबाहेर पडत असतात. मात्र कुठलाही मुद्दा हाताशी घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणे हे योग्य नाही, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post