देशातील जनतेला करोनाची लस केव्हा देणार?; आरोग्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली: जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत देशातील सुमारे २५ कोटी लोकांना करोनाची लस टोचण्यात (Vaccination) येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी संडे संवाद या कार्यक्रमात ही माहिती देत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.

'डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमीन घेऊ नका'

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना Immunity (रोगप्रतिकार शक्ती) Boosters द्वारे करोनापासून बचाव करण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिले. इम्यूनिटी बुस्टर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम नक्कीच करतात, मात्र त्याचे व्यापक परिणाम शरीरावर होत असतात. अशा प्रकारच्या औषधांचा नेमका परिणाम शरीरावर कशा प्रकारे होत असतो याची पूर्ण माहिती उपलब्ध नाही, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. मात्र, नैसर्गिक आहाराच्या माध्यमातून शरीराला होत असलेल्या पोषक तत्वांची पूर्ती सर्वोत्तम असते, असेही हर्षवर्धन म्हणाले.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post