जिल्ह्यातील दस्त नोंदणीचे काम 31 मार्च पर्यंत बंद - जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे आदेश


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्ह्यात नगारीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज दिनांक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हीड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायादा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे.

त्याअन्वये जिल्हाधिकारी है त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्यात आलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post