फोन टॅपिंगप्रकरणी दोन वरीष्ठ अधिकार्‍यांची समिती


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- मागच्या सत्ताधारी लोकांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर राजकीय फायदा करुन घेण्यासाठी केला होता याच्या तक्रारी आल्यावर चौकशी करण्यासाठी दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून या चौकशीचा अहवाल सहा आठवडयात दिला जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

या समितीमध्ये गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग, एसआयडीचे सहआयुक्त अमितेशकुमार या दोघा वरीष्ठ अधिकार्‍यांचा समावेश आहे. इस्रायल जे लोक गेले होते त्या सर्व गोष्टींची चौकशी करुन ६ आठवड्यात अहवाल देण्यात येणार आहे.

नागपाडा येथे शाहीनबागच्या धर्तीवर जे आंदोलन सुरु आहे ते बेकायदा आहे. त्याची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. आज संबंधित आंदोलनकर्त्यांशी चर्चा झाली असून त्यातील लोकांनी भेट घेतली असून ते लवकरच आंदोलन मागे घेतील असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post