स्वित्झर्लंड : जम्मू-काश्मीरसंबंधी भारताने घेतलेल्या निर्णयावर प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे मर्यादीत पर्याय उपलब्ध आहेत. पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला खतपाणी घातले आहे. त्यामुळे पाकिस्तानबद्दल फार कमी विश्वासहर्ता उरली असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. अमेरिकेच्या काँग्रेशनल अहवालात हे म्हटले आहे.
लष्करी कारवाईने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बदलण्याची पाकिस्तानमध्ये तितकी क्षमता नाही. त्यामुळे पाकिस्तानला डिप्लोमसीवर सर्वाधिक अवलंबून रहावे लागणार आहे. अमेरिकेच्या काँग्रेशनल संशोधन अहवालात हे म्हटले आहे. गेल्या सहा महिन्यातील काश्मीरसंबंधीचा त्यांचा हा दुसरा अहवाल आहे.
सीआरएस हा अमेरिकन काँग्रेसचा स्वतंत्र संशोधन विभाग आहे. अमेरिकेच्या हिताच्या दृष्टीकोनातून अमेरिकन कायदे मंडळाच्या प्रतिनिधींसाठी ठराविक कालावधीने सीआरएसकडून असे अहवाल बनवले जातात. अमेरिकन काँग्रेसमध्ये याबद्दल माहिती द्यावी हा त्यामागे हेतू असतो. पाच ऑगस्टला भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानने भारताविरोधात जोरदार रान उठवले पण टर्की, मलेशिया आणि चीन वगळता त्यांना अन्य कुठल्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही.
Post a Comment