अहमदनगरमध्ये एसटी बस - ट्रकच्या भीषण अपघातात तीन ठार, 22 जखमी


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर-
नगर-पुणे महामार्गावर जाणाऱ्या रेल्वे पुलावर एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये तीन ठार व 20 ते 22 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अजून काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन व इतर पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातामध्ये बसमधल्या अनेकांनी उड्या मारल्या असून ते पुलाच्या खाली पडल्यामुळे जबर जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पुण्याच्या दिशेने ट्रक नगरकडे येणारा ट्रक आणि नगरहून पुण्याच्या दिशेने जाणारी बसमध्ये नगरच्या गांधी चौकात चौकाजवळ रेल्वे पुलावर समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर एसटी एका बाजूला कलंडली गेली प्रवाशांनी खाली उड्या मारल्या. त्य़ामुळे ते जबर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत सुरू केली.

अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दोन्ही बाजूंनी मोठ्या रांगा लागल्या. दरम्यान, एसटी बस पुलाच्या बाजूला कलली असल्याचे दिसून येत आहे. अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तेथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post