कांद्याने भाव खाल्ला ; सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय


माय नगर वेब टीम

नवी दिल्ली: देशभरात कांद्याची वाढती मागणी, त्यानुसार होत असलेला कमी पुरवठा आणि वाढत जाणारे दर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यंदा देशात कांद्याचे उत्पादन कमी झाले असून देशातील बाजारांमध्ये मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नसल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांमधून मात्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून देशात कांद्याची आवक कमी झालेली आहे. सततत कांद्याचे भाव वाढत असल्याच्या बातम्याही अनेक दिवसांपासून येत आहेत. यंदा कांद्याचे कमी उत्पन्न झाल्यानेच केंद्र सरकारने मागणी तसा पुरवठा हे तत्त्व पाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

देशातील विविध बाजारपेठेत एव्हाना दक्षिण भारतातून येणार कांदाहील अद्याप दाखल झालेला नाही. राज्यातील कांदाही उत्तर प्रदेश आणि परदेशात जाऊ लागला आहे. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव गगनाला भिडून कांद्याची वानवा निर्माण होऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे.

उद्यापासून घसरणार कांद्याचे भाव

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने उद्या जेव्हा बाजार सुरू होईल तेव्हा सहाजिकच कांद्याची निर्यात होत नसल्याचे निर्यातीसाठीचा कांदा देशातील बाजारांमध्ये वळता होणार आहे. परिणामी कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने कांद्याचे भावही घसरणार आहेत.

शेतकऱ्यांचा मात्र निर्णयाला विरोध

दरम्यान, केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीला मात्र शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याचे कारण म्हणजे कांदा निर्यात बंदीचा थेट परिणाम शेतकरी आणि कांदा उत्पादकांवर होणार आहे. यापूर्वीच सरकारने निर्यात मुल्यात वाढ केल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. आता निर्यातच बंद केल्याने शेतकऱ्यांना मिळणार कांद्याचा भाव कोसळणार आहे

केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे निव्वळ पोरखेळ असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर का उठले आहे?, असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post