नक्षलवादी हल्ल्यात पाच पोलीस शहीद



झारखंड :

झारखंडमध्ये पुन्हा एकदा मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. सरायकेला खरसावन जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ५ पोलीस शहीद झाले आहेत. त्यात २ उपनिरीक्षक आणि ३ पोलिसांचा समावेश आहे.
तिरुल्डीह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुकडू येथे आठवडा बाजारादरम्यान पोलिसांचं पथक गस्तीवर होतं. हे पथक तिथे पोहचताच आधीपासूनच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच पोलीस जागीच शहीद झाले असून काही पोलीस जखमी असल्याचेही सांगण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post