भरती परीक्षेचा गोंधळ... आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी



मुंबई |आरोग्य विभागाकडून (health department exams) घेण्यात येत असलेल्या परीक्षेतील गोंधळ काही केल्या कमी होण्यास तयार नाही. अनेक उमेदवारांना त्यांनी मागितलेल्या परीक्षा केंद्रापेक्षा वेगळेच केंद्रे मिळाले असल्याच्या घटना उघडकीस येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा संचालिका डॉ.अर्चना पाटील (archana paitl)यांनी खुलासा केला आहे.

आरोग्य विभागाच्या (health department exams)परीक्षा गेल्या सप्टेंबर महिन्यात होणार होती. ती परीक्षा ऐनवेळी रद्द झाली होती. आता २४ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होत आहे. परंतु त्यातही गोंधळ सुरु आहे. परीक्षार्थींना एकाच दिवशी होणाऱ्या दोन पेपरसाठी सकाळी एका वेगळ्या जिल्ह्यात आणि दुपारी आणखी वेगळ्या जिल्ह्यात केंद्र देण्याचा ‘महा-पराक्रम’ केला आहे. दुसऱ्यांदा परीक्षा घेताना देखील या तरुणांना मनस्तापच सहन करायला लागत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope)यांनी या परीक्षार्थींना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टरची सुद्धा व्यवस्था करावी, अशी टीका भाजपा आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar)यांनी केली आहे.

टोपे यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी

अनेक परीक्षार्थींना अर्ज करताना जे केंद्र मागितलं ते मिळालंच नाही. तर यावेळी अनेक परीक्षार्थीचे प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ सुद्धा नाही त्यामुळे नक्की परीक्षा कशी द्यायची असे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा निर्माण झाले आहेत. आता या विषयांत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे, शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात याव्या व आपल्या निष्क्रियतेमुळे लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा वेठीस धरण्याचे काम करणाऱ्या व केवळ खोट्या वल्गना करण्यात धन्यता मानणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची तात्काळ मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणीही अतुल भातखळकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post