सोहळे पुरे, आराम द्या! आता माझ्यातली ऊर्जा संपत चालली आहे- नीरज चोप्रा


 

नवी दिल्ली | ऑलिम्पिकविजेत्या नीरज चोप्राला गेल्या १३ ऑगस्टला आपल्या राज्य (हरयाणा) सरकारतर्फे आयोजित सन्मान सोहळ्याला हजर राहायचे होते. मात्र त्यावेळी ताप असल्याने तो या सोहळ्याला हजर राहू शकला नव्हता. हा समारंभ बुधवारी पुन्हा आयोजित करण्यात आला अन् नीरजने त्याला हजेरी लावली. भारतात दाखल झाल्यापासून नीरजला सातत्याने सत्कार सोहळे, प्रसार माध्यमांच्या मुलाखतींना उपस्थित राहावे लागत आहे. पुरेशी झोप मिळणेही कठीण झाले असल्याने त्याला गेल्या काही दिवसांपासून तापाचा त्रास जाणवत आहे.

गेल्या मंगळवारी नीरजचे कुटुंबीय आणि त्याच्या खंडारा गावातील शेजाऱ्यांनी जंगी स्वागत समारंभ आयोजित केला होता. मात्र नीरजच्या अंगातील ताप वाढल्यामुळे त्याला समारंभ अर्धवट सोडून जवळच्याच रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. नीरजला रुग्णालयात न्यावे लागले नसल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याचा ताप शंभरपर्यंत होता. त्यासोबतच घशाचा त्रासही जाणवत होता. नीरजला चक्कर आल्यासारखेही होत होते. नीरजने ७ ऑगस्टला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. ९ ऑगस्ट रोजी तो भारतात दाखल झाला. तेव्हापासून दहा दिवस तो कुटुंबीयांपासून दूर होता.

दिल्ली ते पानीपत अशा रस्तेमार्गाने नीरज गावी दाखल झाला होता. त्याच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या हल्दाना गावापाशी आल्यावरच त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. दिल्ली ते नीरजचे खंदारा गाव हा प्रवास एरवी दोन तासांचा आहे. मात्र त्याची मोटार जशी हरयाणात दाखल झाली, त्यासोबतच विविध ठिकाणी छोट्या-मोठ्या सत्कार समारंभासाठी थांबावे लागत होते. यामुळे हा दोन तासांचा प्रवास सहा तासांचा झाला. नीरजला पाहणे, भेटणे याबाबत प्रत्येकाला उत्सुकता वाटणे सहाजिकच आहे; पण यामुळे करोना प्रतिबंधक नियम मात्र पायदळी तुडवण्यात आले. नीरजनेही मास्क घातलेला नव्हता. गर्दीत मिसळत होता.

हे सत्कार सोहळे अविरत सुरूच आहेत. यामुळे मला खूप दिवसांपासून पुरेशी झोपही मिळालेली नाही. माझे देशबांधव आनंदात स्वागत करतील हे ठाऊक होते; पण आता माझ्यातली ऊर्जा संपत चालली आहे. घरी जाऊन मस्त झोप मिळण्याची आतुरतेने वाट बघतो आहे. -नीरज चोप्रा

अखेर घरी आला

नीरजला या सत्कारसमारंभातून अखेर त्याचे कुटुंबीय आणि पानिपतचे उपायुक्त सुशील सरवान यांनी घरी नेले. टाइम्स वृत्त समूहाशी संवाद साधताना सरवान म्हणाले, ‘नीरजच्या स्वागताच्या ठिकाणी जवळपास २० हजारांपेक्षा जास्त लोक होते. प्रत्येकाला त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचा होता. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या सगळ्यात नीरजची दमछाक झाली

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post