'माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार'



माय अहमदनगर वेब टीम 

जळगाव - कोरोनाच्या काळापासून एसटी मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात आणखी एका एसटी महामंडळाच्या कंडक्टरने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. 'माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईट नोट लिहून जळगावातील एका कंडक्टरने आपले जीवन संपवले.


जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले आणि एस मंडळात कंडक्टर असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली. ''एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा'' असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.


एसटी मंडळामध्ये गेले तीन चार महिने पगार मिळत नसल्याने मनोज कर्जबाजारी झाला होता. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत मनोज चौधरीच्या वडिलांनी दिली आहे.

रत्नागिरी एसटी महामंडळाच्या बस आगारात एका बस कंडक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे असे या बस वाहकाचे नाव आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post