राज्यात अनेक ठिकाणी परतले लॉकडाऊन!



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - राज्यात काेरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने पुन्हा अनेक ठिकाणी कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, औरंगाबादेत शुक्रवारपासून ८ दिवसांच्या लॉकडाऊनचा प्रारंभ झाला. प्रशासनाने बहुतांश दुकाने आणि सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याची घोषणा केल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.

सोलापूर : शहरात लॉकडाऊन होणार आहे. शनिवारी दुपारी अंतिम निर्णय होईल. लोकांना ५ दिवस अगोदर कळवले जाईल.

नांदेड : जिल्ह्यात १२ जुलैपासून आठवडाभर लॉकडाऊन असेल. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहतील.

कल्याण-डोंबिवली : येथील लाॅकडाऊनही १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली.

ठाणे : १९ जुलैपर्यंत संचारबंदी

ठाण्यात २ ते १२ जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. मात्र काेरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे पाहता लाॅकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड : १० दिवस लॉक

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १० दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. येथे १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १० दिवस कडकडीत लॉकडाऊन असेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post