...तर करोनाचा उद्रेक होईल - खा.विखे



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर मध्ये रुग्णवाढीचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. जे रुग्ण आढळून येत आहे, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती गंभीर बनत आहे. अशीच परिस्थिती सुरू राहिल्यास करोनाचा उद्रेक होऊ शकतो.अशा परिस्थितीत नगरसह जिल्ह्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू लावण्याची गरज आहे. अशी
मागणी करणारे पत्र खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले आहे.
खा. विखे यांनी जिल्हाधिकारी द्विवेदी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की,नगरसह जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव वाढत आहे. या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन, अहोरात्र राबत आहे. मात्र बाधित रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर करोना संशयितांची टेस्टिंग व ट्रेकिंग या दोन खात्रीशीर उपाययोजना आपल्या समोर आहेत. एकीकडे करोना रुग्णांची वाढती संख्या तर दुसरीकडे सध्या असलेल्या सुविधांवर पडणारा ताण या कोंडीत आपण सर्व जण सापडलो आहोत. एक महिन्यापूर्वी नगरमध्ये करोना प्रसाराचा वेग प्रतिदिवस एक रुग्ण असा होता. तो आता दिवसाला दोनशे रुग्ण असा झाला आहे. रुग्ण वाढीचा हा वेग अंगावर शहारे आणणारा आहे. त्याच वेळी जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा पोहोचत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. वाढती रुग्णसंख्या, पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपर्यंत पोहोचण्यात येत असलेले अपयश, या सगळ्यांचा परिपाक साथीच्या आजाराच्या स्फोटात होण्याची दाट शक्यता आहे. एक खासदार म्हणून नव्हे तर एक डॉक्टर म्हणून या सर्व गोष्टीकडे बघत असताना करोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी जनता कर्फ्यू लागू करणे हाच पर्याय मला सध्या दिसतो आहे. त्यामुळं नगर शहरात व ज्या तालुक्यांमध्ये जिथं रुग्ण वाढीचा आकडा तीन अंकी आहे, अशा ठिकाणी पाच दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात यावा असे खा.विखे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post