1 मे पासून राज्यात एनपीआर!
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने राज्यात राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) लागू करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चेनुसार येत्या 1 मेपासून राज्यात एनपीआर लागू केला जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने 1 मे ते 15 जूनदरम्यान एनपीआर लागू करण्याची अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून एनपीआर लागू करणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली नाही.
रजिस्ट्रार जनरल अँड सेंसस डायरेक्टर रशमी जगडे यांनी महाराष्ट्र सरकारच्या 20 जिल्हाधिकारी आणि 15 नगरपालिका प्रमुखांशी एनपीआर आणि लोकसंख्येबाबत चर्चे केली. यामुळे अशी सरकारने याला लागू करण्याची परवानगी दिली असल्याची चर्चा आहे. यात एनपीआरला कार्यान्वीत करण्याबाबत रणनिती बनवली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार लवकरच याबाबत एक नोटिफिकेशन जारी करेल. महाराष्ट्रात एनपीआर प्रक्रिया अंदाजे 6 आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Post a Comment