महात्‍मा गांधी यांच्‍या अहिंसेच्‍या विचाराची देशाला गरज - उपायुक्‍त डॉ.प्रदिप पठारे


महात्‍मा गांधी यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍त मनपाच्‍या वतीने अभिवादन
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - महात्‍मा गांधी यांच्‍या अहिंसेच्‍या विचाराची आजच्‍या युवा पिढीला खरी गरज आहे. अहिंसेच्‍या माध्‍यमातून समाजाला एकत्र करून विविध जनआंदोलने उभी केली जावू शकतात व त्यातून प्रश्न मार्गी लागू शकतात.असे प्रतिपादन उपायुक्‍त डॉ.प्रदिप पठारे यांनी केले.

महात्‍मा गांधी यांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍त मनपाच्‍या वतीने वाडीया पार्क येथील महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळयास पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्‍त डॉ.प्रदिप पठारे, नगरसचिव शहाजहान तडवी, प्रसिध्‍दी अधिकारी दिगंबर कोंडा, सुरेश खामकर, बंडू इवळे, बलराम गायकवाड आदी उपस्थित होते.

उपायुक्‍त डॉ.प्रदिप पठारे पुढे बोलताना म्हणाले, शांतता, समता व एकता प्रत्‍येकाने अंगीकारून देशाच्‍या विकासामध्‍ये वाटचाल करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी सन १८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्‍यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले. त्यांचे विचार आज संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post