शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत करावी- खा. विखे


माय नगर वेब टीम
अहमदनगर- राज्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असून, ओल्या दुष्काळाने संकटात सापडलेल्या राज्यभरातील शेतकर्याना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत नूकसान भरपाई म्हणून द्यावी आशी मागणी खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.

अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी संसदेत केंद्र सरकारच्या मदतीबाबतच्या अधिसूचनेवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेवून त्यांनी मदतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

राज्यात अतिवृष्टी व ओल्या दुष्काळामुळे ३० जिल्ह्यातील पिकांचे मोठया प्रमाणात नूकसान झाले. ३२५ गावामधील नूकसानीचे आलेली आकडेवारी पाहाता सुमारे ५४.२२लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नूकसान झाले असल्याकडे लक्ष वेधून खा.डाॅ.विखे म्हणाले की, कोकण विदर्भ मराठवाडा आणि राज्यातील मध्य महाराष्ट्राबरोबरच अहमदनगर जिल्ह्यातही द्राक्ष, सोयाबीन, कांदा, कापूस, मका, बाजरी, तांदूळ, सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नूकसान झाले असल्याने सरकारने या नूकसानीचे गांभीर्य लक्षात घेवून तसेच संकटातून शेतकर्याना सावरण्यासाठी प्रति हेक्टर ५० हजार रूपयांची मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post