नवी दिल्ली - महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा गुंता सुटत असल्याच दिसत आहेत. भाजपच्या नकारानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसोबत येऊन नवीन महाविकासआघाडीची स्थापना केली. लवकरच सर्व गोष्टींवर एकमत झाल्यावर राज्याला नव सत्ता समीकरण पाहायला मिळणार आहे. यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी या महाविकास आघाडीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, ''महाविकास आघाडीचं सरकार टिकणार नाही. जी आघाडी झाली आहे ती सिद्धातांच्या आधारांवर झालेली आघाडी नाही त्यामुळे हे सरकार स्थापन झाले तरीही फार काळ टिकणार नाही," असे गडकरी म्हणाले.
पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, "या दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक ताळमेळ नाही. शिवसेनेच्या विचारधारेला काँग्रेसने कायमच कडाडून विरोध केला आहे. तर काँग्रेसच्या विचारधारेला शिवसेनेने विरोध केला आहे हे आपण जाणतोच. राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची विचारधाराही शिवसेनेपेक्षा वेगळी आहे. विचारांच्या आणि सिद्धांतांच्या आधारे ही महाविकास आघाडी झालेली नाही. ही फक्त संधी साधू आघाडी आहे. त्यामुळेच ही महाविकास आघाडी टिकणार नाही आणि महाराष्ट्रात स्थिर सरकारही देऊ शकणार नाही. महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण होईल. हे जनतेसाठी चांगलं नाही. भाजपा आणि शिवसेनेची युती हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाली होती. मात्र महाराष्ट्रात आत्ता होऊ घातलेली महाविकास आघाडी ही संधीसाधू राजकारणाचे उदाहरण आहे, " अशीही टीका गडकरींनी केली आहे
Post a Comment