लढाई पैलवानांमध्ये होते -शरद पवार
माय नगर वेब टीम
सोलापूर - महाराष्ट्राच्या निडवणुकीत विरोधक नाहीत, असं वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी टोला लगावला आहे. "लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही," असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हातवारेही केले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये आज (12 ऑक्टोबर) दिलीप सोपल यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवार यांनी सभा घेतली.
शरद पवारांचे निकटवर्तीय दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन शिवबंधन हाती बांधलं. आता ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर मैदानात आहेत.
काही दिवसांपूर्वी विरोधकांवर शरसंधान साधताना मुख्यमंत्र्यांनी इथे विरोधक नसल्याचं म्हटलं होतं. याविषयी शरद पवारांनी बार्शीतल्या सभेत भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री, ठाकरे म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीला कोणीला समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते अशांची (हात वारे करुन) होत नाही.
तसंच दिलीप सोपलांवर टीका करताना पवार म्हणाले की, "सोपलांनी विकास करायचा आहे असं सांगून पक्ष सोडला, मग इतकी वर्षे काय केलं? (हातवारे करुन)
Post a Comment