काँग्रेसने काय केले हे ‘त्यांनी ’विचारू नये- आ. थोरात




माय नगर वेेेब टीम
संगमनेर - स्वातंत्र्य चळवळ ते आजचे विज्ञानयुग ही ७० वर्षांची काँग्रेसची पराकाष्ठा आहे. विविध धरणे, रस्ते, शिक्षण अगदी प्रत्येकाच्या हातात मोबाईल ही काँग्रेसची देण आहे. हे काही ५ वर्षांत झाले नाही. निळवंडे धरण, चांगला सहकार, संगमनेरची प्रगती ही आपल्या कामातून झालेली आहे. आपले काम काहींना पाहवत नाही. मागील पाच वर्षांत भाजपा सेनेने फक्त भावनिक राजकारण केले असून विकासावर ते बोलत नाहीत. त्यांनी काँग्रेसने काय केले हे विचारू नये अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

धांदरफळ बुद्रुक येथील प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी समवेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, अ‍ॅड. माधवराव कानवडे, पांडुरंग घुले, अजय फटांगरे, जि. प. सदस्य रामहरी कातोरे, उद्योजक बाळासाहेब देशमाने, भाऊसाहेब डेरे, मिलिंद कानवडे, अनिल देशमुख, विलास कवडे, अनिलराव कासार, अनिलराव देशमुख, सरपंच भानुदास शेटे, नानासाहेब दिघे, रमेश नेहे, बालम तांबोळी, सुरेश खुरपे, अनिल काळे, दिनकरराव देशमुख, प्रभाकर नाईकवाडी, अविनाश वलवे, रामनाथ कवडे, सुनील देशमुख, शैलेश देशमुख, प्रभाकर गाडे, आनंद वर्पे, निशाताई कोकणे, मंगलताई देशमुख, मारुती कवडे, रोहिदास खताळ, अण्णा गोडसे, प्रभाकर गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आ. थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाने आपल्यावर मोठा विश्वास टाकून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. वेळ फार कमी होता. परंतु मी त्यासाठी रात्रंदिवस काम करून जागावाटपाचे काम यशस्वीपणे पूर्ण केले. मी राज्यात प्रचार करतो. तालुक्यात ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हाती घेतली आहे. त्यामुळे मला लढण्याची ताकद मिळाली आहे. सुपर 60 मुळे आता तरुणांना त्यांची जबाबदारी मिळाली ते सुध्दा अतिशय मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन काम करत आहेत.

मला आता संगमनेरची काळजी राहिली नाही. परंतु काही लोक तालुक्यात येऊन चुकीचा गैरसमज करून जनतेला भडकविण्याचे काम करत आहेत. आपण एक दिलाने काम करा. काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष आहे. येथील सहकारी संस्था राज्यात एक नंबरवर आहेत. त्याचे दु:ख विरोधकांना आहे. मात्र तालुक्यातील जनतेचा आपल्याला मोठा पाठींबा आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post