Ayodhya case ; अयोध्या प्रकरणाची सुनावणी आज पूर्ण होण्याची शक्यता



माय नगर वेब टीम
नवी दिल्ली - अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज (बुधवार) शेवटचा दिवस असू शकतो, असे संकेत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले आहेत. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज ३९ वा दिवस होता. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद उद्या पूर्ण करावा, असं सांगण्यात आलं आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेरच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात १० डिसेंबरपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी म्हटलं की, आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील, अशी आशा आहे. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा होईल. मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा पूर्ण झाल्यास आजच निकाल सुरक्षित ठेवला जाईल. मात्र न्यायालय काय निश्चित करणार यावर सगळं अवलंबून आहे.

सर्वोच्च न्यायालयकडून आज दोन्ही पक्षकारांना साडेतीन तासांची वेळ देण्यात येईल. यामध्ये दोन्ही पक्षकारांना कोणत्या प्रकारचा दिलासा हवाय, हे विचारलं जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुनावणी पूर्ण होईल. हिंदू पक्षकारांना एक आणि मुस्लीम पक्षकारांना एक तास देण्यात येणार आहे. तर युक्तीवादासाठी दोन्ही पक्षकारांना ४५-४५ मिनिट देण्यात येणार आहेत.

असंवेदनशील खटला असल्याने अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे, तर २०० शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. शिवाय वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणाचा १७ नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. खटल्याची सुनावणी ज्या खंडपीठासमोर सुरु आहे, त्या खंडपीठाचे अध्यक्ष सरन्यायाधीश रंजन गोगोई हे १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post