माय नगर वेब टीम
अहमदनगर-
निर्दोष सुटल्याच्या रागातून तीन जणांनी एकावर तलवार उगारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. केडगाव येथील अयोध्यानगरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकारामुळे केडगाव पुन्हा चर्चेत आले आहे.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात सुनील तुकाराम भांड, आश्विनी सुनील भांड, सुनील यांचे सासरे (सर्व रा. अयोध्यानगर, केडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, दत्तात्रय नामदेव भवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनील भांड यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातून भवर यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे भांड यांनी 'तुझी निर्दोष मुक्तता कशी झाली', असे म्हणून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. तलवारीसारखे शस्त्राचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दत्तात्रय पवार यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गर्जे हे करीत आहेत.
Post a Comment