अहमदनगर - नगरमधील भाकपचे उमेदवार बहिरनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी आला असता तो बोलत होता. महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत, पण राज्यातील प्रश्नावर कोणी बोलत नाही. प्रत्येक प्रश्नावर फक्त ३७० व रामबाण (राममंदिर) हेच मुद्दे का आणले जात आहेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी सत्ताधार्यांना केला.
भाजपकडून सातत्यानं मोदींचा पर्याय काय असाच प्रश्न विचारला जातो. दुसरीकडे काँग्रेस व अन्य पर्याय असलेले नेते ईडीच्या भीतीने एका रात्रीत गांधीजींचे गुणगान सोडून नथुराम गोडसेची स्तुती करीत आहेत. त्यामुळं जनतेतून आता सर्वसामान्य पर्याय उभा राहिला पाहिजे. नोकर्या जात आहेत. शेतकरी आत्महत्या होत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच आहेत, महाराष्ट्रात मागच्या निवडणुकीत भाजप ने दिलेल्या आश्वसनापैकी किती पूर्ण झाली. किती आश्वासने पुन्हा देण्यात आली आहेत, हे कोणीच विचारत नाही. भाजपही त्यावर काही बोलत नाही, असं कन्हैया म्हणाला.
देशात विरोधकांचा एकच पर्याय उभा राहत नाही, हे दुर्दैव आहे. ईडी व अन्य लोकशाही यंत्रणांचा गैरवापर होत आहे. बिहारमध्ये २०१५ साली जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केले, पण भाजपने तेथील मुख्यमंत्रीच पळवला. धर्माच्या नावाखाली मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशा स्थितीत राज्यघटना व तिने जनतेला दिलेले अधिकार वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असे कन्हैया म्हणाला. शाहीर संभाजी भगत हेही यावेळी उपस्थित होते.
Post a Comment