'तनपुरे निष्क्रिय!; विकासासाठी आ. कर्डिले यांच्या पाठीशी रहा'
खा. सुजय विखे यांच्या तिसगाव मधील सभेत पाथर्डीतील कार्यकर्त्यांना सूचना
माय नगर वेब टीम
अहमदनगर – राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार? अशा निष्क्रिय लोकांच्या नादाला लागू नका, राहुरी - नगर - पाथर्डी मतदार संघाच्या विकासासाठी आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे .
राहुरी-नगर-पाथर्डी मतदार संघातील भाजपचे उमेदवार आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे खासदार सुजय विखे पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे होते. तिसगाव येथे झालेल्या प्रचार सभेदरम्यान खासदार सुजय विखे पाटील यांनी या विधानसभेच्या निवडणुकीपासून दूर राहिलेले माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव पालवे, संभाजीराव वाघ , महादेव कुटे पाटील, पृथ्वीराज आठरे पाटील, राजेंद्र तागड तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे पाटील या सर्वांना आपल्या गाडीत बसून व्यासपीठावर आणताच उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून जोरदार स्वागत केले. यावेळी झालेल्या जाहीर प्रचारसभेप्रसंगी बोलताना खा. सुजय विखे म्हणाले गेली दहा वर्षापासून आमदार कर्डिले यांनी या मतदारसंघात भरीव विकास कामे केली असून पुन्हा त्यांनाच या मतदारसंघातून विकास कामे करण्यासाठी संधी द्यायची आहे. त्यामुळे कुणी विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवण्याचे काम करू नका, प्रामाणिकपणे आमदार कर्डिले यांच्या पाठीशी उभे राहा. या राष्ट्रवादीने नेहमीच जिरवा जिरवीचे, गटातटाचे राजकारण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना घरी बसण्याची जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या सारख्यावर टाकली असून भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा सारथी म्हणून मी या निवडणुकीमध्ये काम करत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये 12 झिरो केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे खासदार विखे म्हणाले.
एखाखा देखणा माणूस प्रचारसभेसाठी आला तर त्याला पाहण्यासाठी गर्दी होणारच असे म्हणत खा अमोल कोल्हेवरही निशाणा साधला. विकासावर बोलण्यासारखे विरोधकांकडे काहीच नाही त्यामुळे भावनिक मुद्दे पुढे करून या निवडणुकीला ते सामोरे जाण्याचे काम करत आहेत. राहुरीत त्यांना विकास करता आला नाही ते मतदार मतदारसंघाचा काय विकास करणार ? वांबोरी चारीचे पाणी टेलच्या गावापर्यन्त पोहचवणार हा मी दिलेला शब्द पूर्ण केला. तिसगावला पाणीटंचाई आहे त्यावर देखील तात्काळ उपाययोजना केल्या जातील वेळप्रसंगी दोन वर्षात तिसगावसाठी स्वतंत्र नळपाणी योजना करू. दिलेला शब्द पूर्ण करण्याची माझी पध्दत आहे . विकास कामात आम्ही कुठेही कमी पडणार नाहीत जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकी प्रसंगी राहुरीच्या विरोधी नेत्यांनी आमच्या बरोबर गद्दारी केलेली आम्ही अजून विसरलो नाहीत. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या कार्यकत्यांनी कोणत्याही अमीशाला बळी न पडता जास्तीत जास्त मतदान घडवून आणा असे आवाहन खा विखे यांनी केले.
यावेळी सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांनी आपली भुमिका व्यक्त करतांना म्हणाले राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो तिसगाव परिसराचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचे पाण्याचा प्रश्न सोडवावा त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत असे आवाहन करीत या निवडणुकीमध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी आपण सर्व राजकीय मतभेद बाजूला सारून ठामपणे उभे राहणार असल्याचे जाहीर केले.
माजी जि. प. सदस्य मोहनराव पालवे, ज्येष्ठ नेते संभाजी वाघ, महादेव पाटील कुटे, राजेंद्र तागड, पृथ्वीराज आठरे या सर्वांनी या निवडणुकीमध्ये खासदार विखे यांचा आदेश प्रमाण मानून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे जाहीर केले. यावेळी वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे ,माजी सभापती मिर्झा मणियार, शिवसेना नेते रफिक शेख, जि. प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, पं.स. सदस्य सुनिल परदेशी, एकनाथ आटकर, माजी सरपंच सुनील साखरे, भाऊसाहेब लोखंडे, विक्रमराव ससाणे, गहिनीनाथ खाडे, अरुण पुंड, उपसरपंच फिरोजभाई पठाण, सिराज पठाण, सरपंच आनिल गीते, अनिल पालवे, शिवसेना शहराध्यक्ष शरद शेंदुरकर, भरत गारुडकर, आबासाहेब काळे, शंकरराव उंडाळे, धीरज मैड, शिवाजी भाकरे, भाऊसाहेब क्षेत्रे, रावसाहेब वांढेकर, राजेंद्र दगडखैर, संतोष शिंदे, बाजीराव वारे, प्रदीप टेमकर, ताराबाई क्षेत्रे, इब्राहीम सय्यद, काकासाहेब लवांडे, आदी उपास्थित होते. यावेळी प्राजक्त तनपुरे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र दगडखैर यांनी भाजपात प्रवेश केला.
Post a Comment