नाशिक - शिवसेनेने केलेल्या कामांच्या आणि शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पुन्हा भगवा होणार आहे, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेकडून विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. "1995 मध्ये नाशकात शिवसेनेचे अधिवेशन झाले होते, त्यावेळी शिवसेनेचे सरकार आले, म्हणूनच आज त्यासाठी नाशिकला आलो आहे", असे आदित्य यावेळी म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांचे कौतुक केले ते म्हणाले की, "शिवसैनिक आणि कार्यकर्ते जनतेची कामे करता व मदत करतात म्हणून आज मला प्रचंड प्रेम मिळत आहे. कार्यकर्त्यांचा जोश आणि जल्लोषच महाराष्ट्र भगवा करणार असलं्याचे ते म्हणाले.
Post a Comment