“महाविकास आघाडी सरकारचं विसर्जन व्हावं ही जनतेची इच्छा”


 

जळगाव | महाविकास आघाडी सरकारचंही आता विसर्जन व्हावं, ही जनतेच्या मनातील इच्छा आहे, अशा शब्दांत भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. आज जी वेळ राज्यावर आली आहे, ती कधीही आलेली नव्हती. अतिशय दुर्दैवी वेळ या सरकारने आणल्याची टीका गिरीश महाजन यांनी सरकारवर केली आहे.

राज्यात आता बदल झाला पाहिजे, हे जनतेच्याच मनात आहे. हे सरकार जाऊन भाजप सरकार आलं तर सर्वांना न्याय मिळेल. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावत आहोत, असं महाजनांनी सांगितलं.

राज्याच्या सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारचं विसर्जन व्हावं, हे सरकार पायउतार व्हावं, असं आमच्यापेक्षा जनतेलाच वाटत आहे. जनता त्रस्त झाल्याचं आज आपण सर्वजण बघत आहोत. जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत, असं गिरीश महाजन म्हणालेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post