..मग खडसे, मुंडे, तावडे या बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?; भाजपला सवाल


 माय वेब टीम 

जळगाव - भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी आज एक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. 'ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना माननीय खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,' असा बोचरा सवाल रोहिणी खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजप व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.


भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी आज एक ट्वीट केलं आहे. त्यातून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर हल्लाबोल केला आहे. 'ओबीसी आरक्षणाचं आंदोलन करताना माननीय खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हे पण सांगा ना,' असा बोचरा सवाल रोहिणी खडसे यांनी फडणवीसांना केला आहे.

रोहिणी खडसे यांनी कालही या संदर्भात ट्वीट करत फडणवीस यांना लक्ष्य केलं होतं. 'आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर १ ऑगस्ट २०१९ रोजी आणि १८ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारे केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाहीत, हे तुम्हाला माहीत व्हायला हवे होते,' असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post