'बिहारमध्ये कधीही होऊ शकते विधानसभा निवडणुकीची घोषणा'

 


माय अहमदनगर वेब टीम

नवी दिल्ली - निवडणुकीसाठी तयार राहा, असा आग्रह मी माझ्या पक्षाच्या लोकांना केला आहे, असे लोक जनशक्ती पक्षाचे  अध्यक्ष चिराग पासवान  यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची  घोषणा कधीही होऊ शकते असे पासवान यांनी म्हटले आहे. ज्या पद्धतीने बिहारमधील सरकार चालले आहे, ते पाहता पक्षाने आपल्या मतदारसंघांमध्ये चांगली तयारी करून ठेवा, अशी सूचनाही पासवान यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. लोक जनशक्ती पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना हे भाकीत केले आहे.

चिराग पासवान यांनी एक ट्विट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'आदरणीय रामविलास पासवान यांनी २८ नोव्हेंबर २००० या दिवशी राष्ट्रवादी विचारांवर आधारित लोक जनशक्ती पक्षाची स्थापना केली होती. पक्षाने नेहमीच राष्ट्रहीताने प्रेरित होत सर्व जातीधर्माच्या लोकांसोबत काम केले आणि समाजाला एकोपा कायम टिकवण्यात महत्वाची भूमिका वठवली.'

लोक जनशक्ती पक्षाच्या स्थापना दिनाच्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक पत्रही लिहिले आहे. त्यांना पत्रात म्हटले आहे की, 'बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीत पक्षाला केवळ १५ जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली होती. मात्र लोक जनशक्तीच्या संसदीय मंडळाने हे मान्य केले नाही. पक्षाला २४ लाख मते आणि सुमारे ६ टक्के मते मिळाली आहेत.' बिहार विधानसभेची निवडणूक २०२५ च्या पुढील निवडणुकीपूर्वी देखील होऊ शकते, असेही पासवान यांचे म्हणणे आहे. 

सर्व २४३ जागांवर पक्षाला आपला कार्यक्रम, आणि दृष्टीकोन मांडता यावा यासाठी आम्हाला सर्व २४३ विधानभेच्या जागांसाठीची तयारी आतापासूनच करायला पाहिजे, असे चिराग पासवान यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post