माजी मंत्री अनिल भैया राठोड यांचे निधन


माय अहमदनगर वेब टीम
 अहमदनगर- शिवसेना उपनेते माजी आ. अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले आहे.  करोनाची बाधा झाली असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू होते. या दरम्यान बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले. 
 गेली 30-35  वर्ष नगर शहराच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राठोड यांच्या निधनाने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे.  सलग पाच वेळा त्यांनी विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व केले. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यात त्यांनी सिंहाचे योगदान दिले होते. शहराच्या राजकारणावर प्रचंड दबदबा असलेल्या राठोड यांची नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.  त्यांना करोनासंसर्ग झाल्याचे कळल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शिवसेना व हिंदुत्वाशी कायम एकनिष्ठ राहत त्यांनी राजकारण, समाजकारण केले. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. त्यामुळे सलग पाच वेळा नगरची आमदारकी त्यांनी भूषवली. युती सरकारच्या काळात काही काळ त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषविले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post