तर मुंबईत अवघ्या ३० लाखांत घर ?



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - मुंबईतील घरांच्या किमती एकीकडे कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असतानाच महाविकास आघाडी सरकार सामान्य मुंबईकरांना स्वस्तातील घरे उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. मुंबईत पहिल्यांदाच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत गृहनिर्माण योजना तयार करण्यात आली आहे. पश्‍चिम उपनगरातील गोरेगाव सारख्या मध्यवर्ती भागात अधघ्या 30 लाखांत घर देण्याची सरकारची तयारी आहे. या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच मुंबईकरांना फक्त 30 लाखांमध्ये घरे खरेदी करता येणार आहेत. ही गृहनिर्माण योजना म्हणजे, सर्वसामान्यांसाठी पर्वणीच असेल.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईत घर घेणे म्हणजे, सध्या सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी गोष्टचं... परंतु, आता सामान्य मुंबईकरांचे आपले घराचे स्वप्न खरे करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान आवास योजनेतून खासगी जागेवर सामान्य मुंबईकरांसाठी ही घरांची योजना आहे. परंतु, अद्याप या योजनेला केंद्र सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. तसेच घरे बांधण्यासाठी इतर परवानग्या मिळणेही आवश्यक आहे. त्यामुळे मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे.जर केंद्र सरकारने वेळेत या योजनेला परवानगी दिली, तर या गृहनिर्माण योजनेचे भूमिपूजन हे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असल्याचीही माहिती म्हाडातील सुत्रांनी दिली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post