महाविद्यालयांत राष्ट्रगीत अनिवार्य


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- शिवजयंतीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तरूण पिढीमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य केले आहे. याची सुरूवात 19 फेब्रुवारीपासून सर्व महाविद्यालयांत सुरू करण्यात आली आहे.

उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवसापासून सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य आहे. अधिसूचनेनुसार महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीताने कामकाज सुरू होईल. महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्याचा हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post