संजय लीला भन्साळींनी केली बालाकोट एअर स्ट्राइकवरील चित्रपटाची घोषणा



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - पुलवामा येथे भारतीय जवानांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशवादी तळावर २६ फेब्रुवारी रोजी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये हे दहशतवादी तळ उद्धवस्त झाले आणि अनेक दहशतवादी मारले गेले. भारतीय हवाई दलाच्या याच शौर्यगाथेवर आता चित्रपट तयार केला जाणार आहे. निर्माते-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रोडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. यासंदर्भातील माहिती प्रोडक्शन हाऊसच्या औपचारिक इन्स्टाग्राम पेजवरुन देण्यात आली आहे.भन्साळी प्रोडक्शनने दिलेल्या माहितीनुसार ‘संजय लीला भन्साळी, भूषण कुमार मनवीर जैन आणि प्रज्ञा कपूर हे संयुक्तरित्या या चित्रपटाची निर्मीत करणार आहेत. सतत लढण्याची आणि कधीही हार न मानणाऱ्या भारतमातेच्या पुत्रांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हा चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे,” असं म्हटलं आहे. तसेच “या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिषेक कपूर करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भारतीय हवाई दलाचे यश साजरे करण्यासाठी केली जात आहे,” असंही भन्साळी प्रोडक्शनच्या पोस्टमध्ये म्हटलं आ

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post