भिंगारमध्ये एकास 5 जणांकडून शिवीगाळ करत बेदम मारहाण



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल न करण्यासाठी व हॉस्पिटलची बदनामी न करण्यासाठी श्रीरामपुरातील एका डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना श्रीरामपूर शहरात वॉर्ड क्र.7 येथे मंगळवारी (दि.10) रोजी घडली.

याबाबतची माहिती अशी की, उर्मिला रमेश गायकवाड या महिलेस दि. 21 ऑक्टोबर रोजी उपचारासाठी डॉ. अनारसे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेच्या पोटात गोळा असल्याने त्यांच्यावर 24 ऑक्टोबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसात तिची तब्येत बिघडल्याने तिला संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेथेही सुधारणा न झाल्याने या महिलेस नगर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे फरक न पडल्याने परत श्रीरामपुरात आणले. दि.27 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या उपचारा दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पेंशटचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच आपल्या हॉस्पिटलची बदनामी न होण्यासाठी वरील समीर माळवे, रमेश गायकवाड, माधवी गायकवाड (सर्व रा.श्रीरामपूर) यांनी डॉक्टरांकडून 10 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जर खंडणी दिली नाही तर जिवे ठार मारुन तुमच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करु, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीसांनी डॉ. संजय शंकर अनारसे (व्यवसाय, डॉक्टर, रा. वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी समीर माळवे, रमेश गायकवाड व माधवी गायकवाड (सर्व रा. श्रीरामपूर) यांच्याविरुध्द गुरनं. 874/2019 आयपीसी 384, 385, 389 (34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उजे करत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post