नगरात तिघांचे अर्ज बाद ; आ.जगताप, राठोड, यांच्यासह १४ जणांचे अर्ज वैध



माय नगर वेब टीम
अहमदनगर - अहमदनगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व शिवसेना उपनेते अनिल राठोड या प्रमुख उमेदवारांसह १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या अर्जाची आज छाननी करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुभाष पांडुरंग शिंदे, राजू हिरालाल गुजर, सुरेश किसन गायकवाड या तीन अपक्ष उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद केले.

सुभाष शिंदे व राजू गुजर यांनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते तर सुरेश गायकवाड यांच्या अर्जावरील सूचकाचे नाव मतदारयादीत नसल्याने या तिघांचे उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. आ. संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस), अनिल राठोड (शिवसेना), श्रीराम येंडे (अपक्ष), श्रीधर दरेकर (अपक्ष), किरण काळे (वचित बहुजन आघाडी) , संतोष वाकळे (मनसे), संदीप सकट (अपक्ष), बहिरुनाथ वाकळे (कम्युनिस्ट पार्टी), संजय कांबळे (अपक्ष), सुनिल फुलसौंदर ( अपक्ष ), सचिन राठोड, श्रीपाद छिंदम (बसप), प्रतीक बारसे (अपक्ष), मिर असीफ सुलतान (अपक्ष) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post