उपनेत्यांनी सारसनगरची बदनामी करू नये - नगरसेवक भागानगरे
माय नगर वेब टीम
अहमदनगर - आमदार संग्राम जगताप यांनी मंजूर करुन आणलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शांतीनगर झोन अंतर्गत फेज - २ योजनेच्या जलवाहिन्यातून गेल्या एक ते दीड वर्षापासून सारसनगर परिसरात मुबलक पाणी पुरवठा सुरु आहे. तेव्हा पासून या भागातील टँकर ही बंद झाले आहे. उगाच संपूर्ण शहरात सारसनगर परिसराची बदनामी करुन स्वतःची राजकीय पोळी उपनेत्यांनी भाजू नये असा टोला राष्ट्रवादी चे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी शिवसेनेला प्रसिद्धी पत्रकाद्वारे लगावला आहे.
नगर शहरामध्ये या पाच वर्षांच्या काळात आमदार संग्राम जगताप यांनी विकास केला आहे. तरुणांच्या हाताला काम दिले आहे. सारसनगर भागाची बदनामी करणाऱ्याला निवडणूकीत मतदानातून सारसनगर भागातील नागरिक देतील उत्तर देतील असे नगरसेवक भागनगरे यांनी म्हटले आहे. दरम्यान शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांची सारस नगर भागात प्रचार फेरी काढली होती. सारसनगर परिसरात आजही टँकरने पाणीपुरवठा कारण्याची वेळ का येते असा सवाल त्यांनी प्रचार फेरी दरम्यान उपस्थित केला होता. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी प्रतिउत्तर दिले.

Post a Comment