माय नगर वेब टीम
अहमदनगर : केंद्रात भाजपाचे सरकार आले असून राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजना भाजपा सरकारच्या माध्यमातून मीच पूर्ण करणार आहे. नगर तालुक्यातील बुऱ्हाणनगर योजनेचे पाणी टाकळी काझी पर्यंत येते ते पुढे चिचोंडी पाटील व परिसरातील गावांना देण्यासाठी सुधारीत आराखडा तयार करणार असुन चिचोंडी पाटीलसह परिसरातील गांवाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास प्रयत्न करू असे अश्वासन माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी दिले.
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गटात पाचपुते यांनी प्रचार सभा घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, लोकसभेत भाजपचे सरकार असून विधानसभेला ही युतीचे सरकार येणार आहे. त्यामुळे साकळाई योजना हि मी पूर्ण करणार आहे. तसेच बुर्हाणनगर पाणी योजनेचे पाणी चिचोंडी पाटील, दशमीगव्हाण, सांडवा, मांडवा, आठवड आदी उर्वरित गावांसाठी देण्यासाठी नव्याने प्रस्ताव करू असे आश्वासन पाचपुते यांनी चिचोंडी पाटील येथील प्रचारसभेत बोलतांना दिले.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक बाजीराव हजारे, भाजपचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, उपसभापती प्रवीण कोकाटे सेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत, पंचायत समिती सदस्य, संदीप गुंड माजी जिल्हा परिषद सदस्य बापू सदाफुले, माजी सरपंच शंकर पवार, उपसरपंच महेश जगताप, बबन शेळके, माजी पंचायत समिती सदस्य पोपट निमसे, बाळासाहेब ठोंबरे, राजू कोकाटे, युवा मोर्चाचे मनोज कोकाटे आदि उपस्थित होते.
कर्डिलेचे कार्यकर्ते पाचपुतेच्या प्रचारात...
आमदार शिवाजी कर्डिले यांनी आपल्या निवासस्थानी नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पाचपुते यांच्या मागे ताकद उभी करण्याची सूचना केली. हा आदेश पाळत कर्डिले यांचे कार्यकर्ते आता पाचपुते यांच्या प्रचारात सक्रिय झालेले दिसले.
Post a Comment