युतीवर काळे ढग, उद्धव ठाकरेंकडून स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आदेश
माय नगर वेेेब टीम
मुंबई - विधानसभेच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीवर काळे ढग निर्माण झाले आहेत. समाधानकारक जागावाटप झालं नाही तर गाफिल राहू नका, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिल्या असल्याची माहिती समजते.
सध्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. यामध्ये शिवसेनेला कमी जागा देण्याबद्दल बोललं जात आहे. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकसभेला भाजपनं मला नाही तर बाळासाहेबांना शब्द दिला आहे. मुख्यमंत्री, अमित शाह यांच्यासोबत आपलं 50-50 चं ठरलं आहे. त्यामुळे लोकसभेचा शब्द पूर्ण करतील अशी आशा आहे, असे ठाकरे म्हणाले.
युती होईल अशी सध्या वाटचाल सुरु आहे. पण युती तुटलीच तर तुम्हाला 288 जागांवर लढावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही आता सर्वांनी तयारीला लागा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या. युती होणारच आहे पण तरीही गाफील राहून चालणार नाही, असेही ते म्हणाले
मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेचे सर्व जिल्हाप्रमुख, मुंबईतील विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखही उपस्थित होते. त्यावेळी तेे बोलत होतेे.
Post a Comment