केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात, कधीही होऊ शकते विधानसभेची घोषणा!





माय नगर वेब टीम
मुंबई -  राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हे पथक मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत येऊन स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मुंबईत आढावा घेतल्यानंतर बुधवार पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच वेळी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसांत विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत निवडणुकांचा आढावा घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट दिल्लीत सादर केले जातील. त्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केली जाईल. महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commision of India) महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा (Haryana) आणि झारखंड (Jharkhand)या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते. या तिन्ही राज्यात या वर्षा अखेरीस निवडणुका पार पडणार आहेत.

महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पहिला निवडणुका होतील. अर्थात अद्याप या दोन्ही राज्यांतील निवडणुकीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. या दोन्ही राज्यात दिवाळीच्या आधी नवे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसंदर्भात केंद्रीय निवडणू्क आयोगाची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post